शिरूर हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक महत्त्वाचे शहर असून, ते घोड नदीच्या काठावर वसलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची वडू बुद्रुक येथील समाधी या शहरापासून जवळ आहे. सध्याच्या काळात शिरूर हे या परिसरातील एक शैक्षणिक तसेच औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेले आहे. येथील रामलिंग मंदिर प्रेक्षणीय आहे.