चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील चोर गणपतीला दीडशे वर्षांची परंपरा आहे. कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या गणपतीचे गुपचूप मंदिरात आगमन होते. विसर्जन न करता पुन्हा त्याच ठिकाणी हा गणपती परत येतो. यामुळे या दीड दिवसाच्या गणपतीला चोर म्हणतात.