नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे. प्रत्येक वर्षी येथून पंढरपूरला जाण्यासाठी पालखी निघते. हजारो वारकरी या पालखीसोबत पंढरपूरला जातात. येथे असणारे मोहिनीराज मंदिर देशभर प्रसिद्ध आहे.