वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते. या नदीच्या किनाऱ्यावर केदारेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर असून ते राज्यभर प्रसिद्ध आहे. वारुड शहर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे.