निमगाडे, अनिल यादवराव
अनिल यदाओराव निमगाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 जानेवारी, 1972 रोजी झाला. अतिशय धार्मिक वृत्तीचे व आहाराने शुध्द शाकाहारी असलेले निमगाडे एक प्रतिष्ठीत क्रीडा अधिकारी आहेत.
[…]
अनिल यदाओराव निमगाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 जानेवारी, 1972 रोजी झाला. अतिशय धार्मिक वृत्तीचे व आहाराने शुध्द शाकाहारी असलेले निमगाडे एक प्रतिष्ठीत क्रीडा अधिकारी आहेत.
[…]
डॉ. संजय गोविंदराव पोहरकर हे लाखनी, या भंडारा जिल्ह्यामधील गावामध्ये वास्तव्यास असणारे प्रतिभावंत साहित्यीक, व कलाकारी वृत्तीचे कवी आहेत. शिक्षण कला व साहित्य या एकमेकांस बर्यापैकी पुरक असलेल्या प्रांतांमध्ये त्यांचा राबता लक्षणीय स्वरूपाचा आहे. पेश्याने शिक्षक, आवडीने साहित्यीक व उत्तुंग प्रतिभेने कवीत्व स्वीकारलेल्या पोहरकरांचे व्यक्तिमत्व या तिनही क्षेत्रांवर साज चढवणारेच आहे.
[…]
नरेंद्र श्रवणजी लोहबरे यांचा जन्म 16 एप्रिल, 1976 रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये झाला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या नरेंद्रजी यांना देश विदेशांतील पुरातन तसेच आर्वाचीन काळामधली नाणी जमविण्याचा फार मोठा छंद आहे […]
विशाल रामचंद्र हरियाण यांचा जन्म 3 मार्च 1989 मध्ये झाला. मुळचे ते मराठी नसले तरी मराठी मातीत वाढल्यामुळे, मराठी सवंगडयांबरोबर मिसळल्यामुळे, व मराठी संस्कृतीत रूजल्यामुळे त्यांची नाळ याच भाषेच्या गर्भात अगदी खोलवर गेलेली होती. शाळेत असल्यापासुनच मराठीच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी काहीतरी भरीव व लक्षणीय करण्याची त्यांच्या मनी प्रचंड हुरहुर होती.
[…]
निलेश दत्ताराम बामणे हे ठाण्यामधील प्रतिभावंत व हौशी लेखक व कवी असून नुकतेच त्यांच्या ‘कवितेचा कवी’ व ‘प्रतिभा’ या दोन कवीतासंग्रहांनी, अगदी थाटात मराठी कविताविश्वामध्ये आगमन केले. ठाण्याच्या सिध्दी फ्रेन्डस पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे कवितासंग्रह अनुक्रमे 2009 व 2010 मध्ये प्रकाशित झाले व त्यांना मराठी रसिकांकडुन उदंड प्रतिसाद लाभला.
[…]
गजानन मुरलीधर मुळे यांचा जन्म ९ मे १९८३ मध्ये लातुर येथे झाला. ‘कधीच इथे मी’ ह्या त्यांच्या प्रसिध्द कवितासंग्रहाला नुकताच राजकीय स्तरावरील काव्यलेखन सोहळ्यामध्ये, सैला सायनकर यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला.
[…]
नाशिक येथील रहिवासी असलेले कुलकर्णी तेथील स्थानिक परिसरात त्यांच्या विविध वैद्यकीय कौशल्यांसाठी व रोगांच्या अचुक निदानासाठी वाखाणले गेलेले आयुर्वेदिक तज्ञ आहेत. […]
डॉक्टर रमेश सीताराम सुर्यवंशी हे संशोधक वृत्तीचे शिक्षक, व आदिवासी बोली भाषांमधले तज्ञ मानले जाणारे एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, भाषाशास्त्र, व लोकसाहित्याचे गाढे आभ्यासक, तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांनी समाजात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आजवरच्या त्यांच्या शैक्षणीक प्रवासावरूनच, डॉक्टरांच्या असामान्य बौध्दिक क्षमतांची व आभ्यासु व्रुत्तीची झेप आपल्या त्वरीत लक्षात येईल, अशा कौतुकास्पद तर्हेने त्यांनी ही कारकिर्द घडवली आहे.
[…]
सुभाष थोरात यांचा जन्म 17 जानेवारी 1957 मध्ये पावनवाडी येथे झाला. सरकारी सेवेमध्ये रूजु झाल्यानंतर, अभियांत्रिकी कौशल्यांमध्ये त्यांनी अभुतपुर्व असे यश मिळविले आहेत. थोरात हे शिक्षणाने मॅकेनिकल इंजिनीयर असुन त्यांना कविता करण्याचा, लघुकथा लिहीण्याचा व वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके चाळण्याचा छंद आहे.
[…]
डॉक्टर मधुसुदन जोशी हे पनवेलमधील नावाजलेले वैद्यकिय तज्ञ असुन गेली दहा वर्षे त्यांनी, त्यांच्या क्लिनीकची पायरी चढणार्या कुठल्याच रूग्णाला निराश होवून पाठवले नाहीये. इतकी वर्षे या व्यवसायात असल्यामुळे समृध अनुभवांची व विवीध वैद्यकिय कौशल्यांची पोतडीच त्यांच्याजवळ जमा झाली आहे.
[…]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes