राज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात कातकरी, ठाणे जिल्ह्यात वारली, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात गोंड आणि अमरावती जिल्ह्यात कोरकू या आदिवासी जमात प्रामुख्याने आढळतात.