श्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे. सेंट्रल रेल्वेच्या दौंड मनमाड लाईनवर बेलापूर गावाजवळ जेव्हा नवे रेल्वेस्थानक तयार करण्यात आले, तेव्हा हळूहळू या रेल्वेस्थानकाभोवती वस्ती वाढू लागली व त्यानंतर श्रीरामपूर हे शहर तयार झाले.