दगडी कोळसा हे महत्त्वाचे ऊर्जा खनिज असून, याचा उपयोग औष्णिक ऊर्जा निर्मिती, रेल्वे, खते व रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून करतात.
देशातील ७० टक्के विद्युत निर्मिती दगडी कोळशातून होत आहे.
देशात सुमारे २५,३३० कोटी टन विविध प्रकारचा दगडी कोळसा असून, यापैकी ३.५ टक्के कोळसा साठे महाराष्ट्रात प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात एकवटलेले आहे.